केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाने विकण्याची वेळ आली- पालकमंत्री अशोक चव्हाण

file photo
file photo

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आहे. या धोरणामुळे दोन कारखाने विकावी लागली. साखरेला कमी भाव तर ऊसाला जादा भाव द्यावा लागला. यामुळे कारखाने तोट्यात आले. ही तफावत दुर करण्यासाठी तीन वर्षे केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ झाली आहे. साखरेच्या तुलनेत ऊसाला भाव ठरविण्यात यावा. केंद्र सरकारकडे 18 कोटी बाकी आहेत. यावर व्याज मिळत नाही पण कारखान्याला व्याज मागण्यात येत आहे. साखर उद्योगाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे प्रतिपादन भाऊराव सहकारी साखर कारख्याचे संस्थापक आध्यक्ष तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी (ता. 13)  वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.

भाऊरावचच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना श्री चव्हाण म्हणाले की, यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणे पुर्ण क्षेमतेने भरली आहेत. पाणी पाळ्यांचे योग्य नियोजन लावण्यात आले. पांदण व गाव रस्त्यांना क्रमांक देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जे सरपंच गावात चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी मी राहील. निवडणूक जवळ आल्याने विरोधक दिशाभूल करतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. गेल्या 27 वर्षात संस्था चांगल्या प्रकारे चालवली आहे. जिल्ह्यातील कारखाने बंद पडले आहेत. साखरेला भाव परवडत नसल्यामुळे इथेनाॅल निर्मिती, रस विक्री याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन श्री चव्हाण यांनी केले.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची 27 वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली येहळेगाव (ता. अर्धापूर) कारखाना परिसरातील मैदानावर संपन्न झाली. या सभेला कारखान्याचे संस्थापक आध्यक्ष पालकमंत्री अशोक चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या सभेला उपाध्यक्ष प्रा. कैलास दाड, नरेंद्र चव्हाण, काॅग्रेसचे जिल्हाधक्ष गोविंदराव शिंदे, बाजार समितेचे माजी सभापती बी. आर. कदम, श्यामराव पाटील टेकाळे, बालाजी गव्हाने, मारोतराव गव्हाणे, आनंद कपाटे, मारोती सोमवारे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. सभेत संचालकांनी सभे पुढील 16 विषयांचे वाचन केले. त्याला उपस्थित सभासदांनी अनुमोदन दिले.

या सभेला संचालक रंगराव पाटील इंगोले, अॅड. सुभाषराव कल्याणकर, प्रवीण देशमुख, व्यंकटराव कल्याणकर, शिवाजी पवार, किशनराव पाटील, बालाजी शिंदे, माधवराव शिंदे, रामराव कदम, मोतीराम जगताप, दत्तराम आवातिरक, अशोक कदम, भिमराव कल्याणे, सुभाषराव देशमुख, आनंदराव सावते, श्यामराव पाटील, कमलबाई सुर्यवंशी आदी उपस्थित होते. तसेच राजु शेटे, आर. आर. देशमुख, व्यंकटराव साखरे, पिराजी साखरे , गोविंद गोदरे, रामराव कदम, दत्ता सुर्यवंशी, मुसबीर खतीब, डॉ. यु. एम. इंगळे आदी सभासद, शेतकरी उपस्थित होते. यासभेचे सुत्रसंचलन शिवाजीराव धर्माधिकारी यांनी केले तर आभार प्रवीण देशमुख यांनी मानले. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com