नांदेड ग्रामीण भागात अद्यापही लोटा परेड सुरूच

गुड मॉर्निंग पथके सुस्त, स्वच्छता अभियान खुंटीला
clean india
clean indiasakal

अंजनखेड : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हागणदारी मुक्त गाव राबवित असताना ग्रामीण भागात विशेष दक्षता गुड मॉर्निंग पथके तयार करण्यात आले होते. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक या पथकाच्या धास्तीने चांगलेच घाबरून असायचे; मात्र अनेक ग्रामीण भागातील ही पथके आता दिसून येत नसल्याने, उघड्यावरील लोटा परेड वाढीस लागली आहे. परिणामी ग्रामीण भागात स्वच्छता अभियान व हागणदारी मुक्त गाव या योजनेला गुंडाळून ठेवल्याचे दिसून येत आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेवर भर दिला जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात अधिक लक्ष केंद्रित करीत प्रत्येक घरी शौचालय या अंतर्गत शौचालय बांधून देण्यात येत आहे. मात्र अनेकांनी शौचालयाचा वापर न करता लोटा पध्दत अद्यापही चालू ठेवली आहे. विशेष म्हणजे, उघड्यावरील शौचास निर्बंध घालण्यासाठी ग्रामीण स्तरावर विशेष गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली होती. या पथकाद्वारे पहाटे व संध्याकाळच्या सुमारास पाहणी करून उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे अस्त्र उगारले होते. या पथकाच्या धडक कारवाईमुळे ग्रामीण भागात काही प्रमाणात उघड्यावरील शौचावर नियंत्रण प्राप्त करण्यात यश आले, मात्र कालांतराने ही पथके सुस्त झाल्याने ग्रामीण भागातील लोटा बहाद्दरांची संख्या पुन्हा वाढीस लागली आहे. परिणामी ग्रामीण भागात स्वच्छता अभियान खुंटीला टांगून ठेवलेले दिसत आहे.

clean india
Political News: बहुमताच्या जोरावर भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

ग्रामीण तसेच शहरी भागात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिक याबाबत अद्यापही अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातही शौचालय बांधकाम करण्यात आले. मात्र नागरिक याचा वापर न करता अनेक जण उघड्यावर जाण्यास पसंती देत आहेत. तर काही नागरिक शौचालयाचा वापर लाकडे व सरपण इतर साहित्य ठेवण्यासाठी करतांनाही दिसून येतात. परिणामी शासनाची स्वच्छ भारत व हागणदारी मुक्त गाव या योजनेचे लक्तरे उडत आहेत.

clean india
Political News: बंडखोरी महाआघाडीसाठी धोक्याची घंटा

चौकट-शासनाने संबंधित लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देताना शौचालय बांधकामाची अट लागू केली आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिक या नियमाला अपवाद ठरत आहेत. काही लाभार्थ्यांनी अर्धवट बांधकाम करून शासन व प्रशासनाची दिशाभूल केली आहे. तर शौचालयाकरता मिळत असलेल्या अनुदानातून काही रक्कम बांधकामासाठी खर्च करून इतर रक्कमेची उधळपट्टी करीत असल्याचेही चित्र पाहायला मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com