

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी अभ्यासात गुंतल्याचे दिसून येत आहे. पण, परीक्षेचा ताण आला असेल, अस्वस्थ वाटत असेल, चिंता वाटत असेल तर समुपदेशकांना दूरध्वनी करून चिंतामुक्त व्हा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.