

Nanded News
esakal
बिलोली: राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठा गाजावाजा करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, मार्च महिना उलटूनही अद्याप या योजनेचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला नाही.
शिवाय, पीकविम्याचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी संभ्रमात असून, कर्ज भरायचे की कर्जमाफीची वाट पाहायची, अशा पेचात शेतकरी अडकलेले आहेत.