नांदेड : नद्यांकाठच्या गावांना विसर्गामुळे सतर्कतेचे आवाहन

विष्णुपुरी धरणाच्या वरील प्रकल्पातून अंदाजे पाच लाख १८ हजार ३४० क्युसेक प्रवाह गोदावरी नदीत सुरू
नद्यांकाठच्या गावांना विसर्गामुळे सतर्कतेचे आवाहन
नद्यांकाठच्या गावांना विसर्गामुळे सतर्कतेचे आवाहनCanva

नांदेड : विष्णुपुरी धरणाच्या वरील प्रकल्पातून अंदाजे पाच लाख १८ हजार ३४० क्युसेक प्रवाह गोदावरी नदीत सुरू असून टप्प्याटप्प्याने तो नांदेड शहरातून प्रवाहित होणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरील नदीची धोक्याच्या पातळीपर्यंत ३५४ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

जायकवाडी प्रकल्पातून बुधवारी (ता.२९) दहा हजार क्सुसेक विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आला आहे. निम्न दुधना प्रकल्पातून ३० हजार ३२४ क्युसेक विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू आहे. माजलगाव या प्रकल्पातून २१ हजार ९७१ क्सुसेक विसर्ग सुरू आहे. दिग्रस बंधाऱ्यातून तीन लाख ७४ हजार ३४१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. पूर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिद्धेश्वर) पाणलोट क्षेत्रातून सिद्धेश्वर धरणाखाली पूर्णा नदीत एक लाख एक हजार ७९५ क्सुसेक विसर्ग सुरू आहे. पूर्णा पुलाजवळ एक लाख ४३ हजार ९९९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते.

नद्यांकाठच्या गावांना विसर्गामुळे सतर्कतेचे आवाहन
टेंभुर्णी : ‘विठ्ठलराव शिंदे’ने दिली १०० टक्के एफआरपी

सद्य:स्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे त्या प्रकल्पातून चार लाख ५७ हजार ३२० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पोचमपाड प्रकल्प भरल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. विष्णुपुरी प्रकल्पाच्या १५ दरवाजांतून दोन लाख ४७ हजार ३७५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. संततधार पावसामुळे येव्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जुन्या पुलाजवळ सध्याची पाणीपातळी ३५२.८५ मीटर एवढी आहे. ऊर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही शंभर टक्के भरले असल्याने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. ऊर्ध्व मानार प्रकल्पातून बुधवारी सकाळी अकरा वाजता दोन हजार ३६९ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले आहे. ऊर्ध्व पैनगंगा धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास तेथील दहा दरवाजे उघडून ४८ हजार २०४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com