नांदेड : सहा लाख ६० हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

३१ जुलैपर्यंत मुदत; नांदेड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
Pik-Vima-Yojana Dheeraj Kumar
Pik-Vima-Yojana Dheeraj Kumar sakal

नांदेड : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत खरिप हंगामात २०२२-२३ या वर्षासाठी आत्तापर्यंत शुक्रवार (ता. २२) अखेर राज्यभरातून ३९ लाख २१ हजार ९३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून सहा लाख ६० हजार ४८२ अर्ज दाखल झाले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची हानी होते आणि त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. ही योजना ता. ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारअखेर (ता. २२) नांदेड जिल्ह्यातील सहा लाख ६० हजार४८२ शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून नांदेड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी दिली आहे.

यावर्षी नांदेड जिल्हा प्रशासनाने दहा लाख

नोंदणीचे लक्षांक निर्धारित केले आहे. मागील वर्षी नऊ लाख दहा हजार नोंदणी झाली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः आत्तापर्यंत तीन वेळा विमा कंपनी आणि तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा पिक विमा भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना विविध माध्यमातून जनजागृती करून आवाहन करण्यात येत असल्याची माहिती श्री. चलवदे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com