नांदेड : तुरीवर रोग पडल्याने तुरीच्या झाल्या तुराट्या

file photo
file photo

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) ः तालुक्यात तुरीवर रोग पडल्याने हाताला आलेली तुर वाळून गेल्याने बळीराजाच्या संकटात पुन्हा भर पडली असून महसूल विभागाने तुर पिकांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील बळीराजातून केली जात आहे.


तालुक्यात ह्या वर्षी मोठ्या पावसाची नोंद तालुक्यात झाली असल्याने कापूस सोयाबीन पिके हातून गेली परिणामी कापसाच्या पराट्या झाल्या. आणी कापूस उत्पादनात मोठी घट झाली. सोयाबीनची सुद्धा हिच गत होऊन प्रती बॅगला नऊ ते दहा क्विटंल उतारा अपेक्षित असताना मात्र पाच ते सहा क्विटंल उतारा आला असून आता वर्षभर संसाराचा गाडा कसा चालवायचा म्हणून तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे.

कापूस गेला सोयाबीन गेले आता शेतकऱ्यांला आधार देणारे नगदी पीक तूर रोग रोग पडल्याने तुरीची उभी झाडे वाळून गेल्याने होती ती आशा मावळली असून हा भयंकर रोग कोणता तो शोध कृषी विभागने लावणे अपेक्षित आसताना मात्र अद्याप कृषी विभागातील एकही अधिकारी व कर्मचारी बाधांवर गेला नाही. तरी शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

शासनाकडून सर्वे करून तत्काळ मदत द्यावी.

शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून तूर या पिकाचा मोठा आधार आहे. मात्र तुर वाळून गेली असल्याने आम्हा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून सर्वे करून तत्काळ मदत द्यावी.
- भुजंग देशमुख, शेतकरी, पोटा.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com