नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीत वाड्याला आले महत्त्व ; एका एका मतांची होतीय जुळवा जुळव

file photo
file photo

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायत निवडणूक ही जितकी सोपी आहे तेव्हढीच ती अवघड आहे. वार्डातील मतदारांची संख्या कमी असल्यामुळे एक एक मत महत्वाचे ठरते. तसेच गावाच्या व आणि भावकीच्या विरूद्ध जावू नये असे म्हंटले जाते. जेंव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भावकीला व वाड्याला विशेष महत्त्व येत. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वाड्याला व खुटाला विशेष महत्व आले असून ज्यांचा वाडा व खुट मोठे त्या उमेदवाराचा विजय होण्यास मदत होते असे अनेकदा निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक दोन, तिन पॅनलमध्ये होत असून ग्रामीण भागातील राजकारण थंडीमध्ये वातावरण गरम होत आहे. प्रत्येक पॅनलमध्ये एक एक मतासाठी चढाओढ लागली आहे.

ग्रामीण भागातील निवडणुका वाडा, भावकी, आडनाव, खूंट यांच्या भोवती फिरत असते. तसेच जात हा महत्वाचा घटक असतो .पण काही गावात एकाच जातीचे प्राबल्य असते. अशावेळी वाड्याला विशेष महत्त्व येते. आपला वाडा कसा मजबूत राहील यासाठी विशेष  प्रयत्न केले जातात. तसेच भावकीला एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवार हे, भावकीतील व जवळचे नातेवाईक निवडणुक लढत असल्यामुळे मतदारांसमोर धर्मसंकट निर्माण होते. तसेच दुरावा निर्माण होतो. हा दुरावा काही प्रसंगी दिर्घकाळ ठरतो. त्यामुळे आम्हाला भावकीच्या व वाड्याविरूद्ध जात येत नाही, भावकीच्या उमेदवारांसोबत रहावे लागते असे सांगून मतदार वेळ मारून नेतात. ग्रामपंचायत निवडणुक जशी जशी जवळ येईल तसे तसे वातारणात थंडीत गरम होणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या वाड्याची चिरेबंदी भिंत कशी भक्कम राहीला यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com