

Academic Loss Mounts as Kinwat School Stays Locked
esakal
ईस्लापूर: किनवट तालुक्यातील ईस्लापूर येथे दि. २७ रोजी दिलेल्या निवेदनानंतर सावरकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पालकांनी कुलूप ठोकले होते. मात्र, तब्बल तीन दिवस उलटूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचे चित्र समोर येत असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.