कुलगुरु अशोक ढवण
कुलगुरु अशोक ढवण

आदिवासी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर वाढवावा- कुलगुरु डॉ. अशोक ढवण

अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, हैदराबाद येथील अखिल भारतीय ज्वार संशोधन केंद्र व कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी सब प्लॅन अंतर्गत ही अवजारे वाटप करण्यात आली.

तामसा ( जिल्हा नांदेड ) : जंगलबहुल भागात शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांनी सुधारित कृषी अवजारांचा वापर शेतात करून शेती व स्वतः ला सक्षम बनवावे, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी गुरुवारी (ता. २४) केले. ठाकरवाडी (ता. हदगाव) या आदिवासीबहुल व दुर्गम गावामध्ये कार्यरत कृतिशील आदिवासी शेतकरी गटाला अंदाजे दहा लाख रुपयांचे शंभर टक्के अनुदानीत सुधारित कृषी अवजारांचे वाटप परभणीच्या कृषी विद्यापीठात झाले.

अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, हैदराबाद येथील अखिल भारतीय ज्वार संशोधन केंद्र व कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी सब प्लॅन अंतर्गत ही अवजारे वाटप करण्यात आली. यावेळी कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद बासकर, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी, नांदेडच्या कृषीविज्ञान केंद्राचे संचालक शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख, 'आत्मा'चे हदगाव तालुका कृषीतंत्र अधिकारी सतीश खानसोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सहा महिन्यापूर्वी ठाकरवाडी येथील आदिवासी शेतकरी गटाचे सादरीकरण डॉ. देवीकांत देशमुख व सतीश खानसोळे यांच्या पुढाकाराने परभणीच्या कृषी विद्यापीठात झाले होते.

हेही वाचा - कोंढा (जि. नांदेड) येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली.

विद्यापीठांने या गावची शिफारस आदिवासी सब प्लॅनसाठी केली. राज्यातून दरवर्षी एक किंवा दोन आदिवासी गावांची या योजनेसाठी निवड होते. योजनेस पात्र आदिवासी शेतकरी गटास पूर्ण अनुदानित व आधुनिक सुधारित कृषी अवजारे दिली जातात. कुलगुरु डॉ. ढणव यांच्या हस्ते शेतकरी गटाचे अध्यक्ष बसाजी गायकवाड, सचिव विश्वनाथ गारोळे यांना कृषी अवजारे सुपूर्द करण्यात आली. ज्यामध्ये हालर, गिरणी, बियाणे प्रतवारी यंत्र ,कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध प्रकारच्या कृषीयंत्राचे संच आदींचा समावेश आहे. यावेळी डॉ. ढणव यांनी आदिवासी शेतकऱ्यांनी गावाला कृषिनिष्ठ बनवून समृद्ध करण्याचे आवाहन करुन आपण स्वतः ठाकरवाडीला भेट देणार असल्याचे स्पष्ट केले. संचालक संशोधन डॉ. वासकर म्हणाले, कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज असून आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतावरील खर्च कमी करणे, कृषी निविष्ठामध्ये बचत करणे .कमी मजुरांची आवश्यकता भासणे आदी समस्याचे निरसन करण्यासाठी सुधारित कृषी अवजारे संशोधनातून निर्माण झाले असल्याचे स्पष्ट केले.

येथे क्लिक करा - मुंबई- जालना जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत न्यावी- खासदार हेमंत पाटील

डॉ. स्मिता सोळंकी यांनी प्रास्ताविकात आदिवासी शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी अवजारांचा वापर वाढवावा तसेच विद्यापीठ पथकाच्या भेटी दरम्यान ठाकरवाडी येथे अवजारे उपलब्ध होऊन त्याचा वापर होतो, हे दिसणे आवश्यक आहे. अन्यथा कृषी अवजारे वापस घेण्याची कार्यवाही होते, हे स्पष्ट केले. कृषीविज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. देवीकांत देशमुख , 'आत्मा' चे अधिकारी सतीश खानसोळे यांच्या यशस्वी पाठपुराव्याचे यावेळी कौतुक झाले. आभार डॉ. एस. एस. देशमुख यांनी मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com