नायगाव : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी नायगाव तालुक्यात दोन दिवसांत दोघांनी आत्महत्या केली आहे. टिकणारे आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाच्या अंमलबजाणीकडे सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप होत आहे.
रानसुगाव (ता. नायगाव) येथील प्रकाश व्यंकटी जाधव (वय ४९) यांनी आरक्षणाबाबत उल्लेखाची चिठ्ठी लिहून मंगळवारी (ता. १९) घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
याच तालुक्यातील बळेगाव येथील भिवजी देविदास बेलकर (वय २४) या तरुणाने गुरुवारी चिठ्ठी लिहून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.