
कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्येच कोल्हापुरातून निवडणूक लढवायली हवी होती; मात्र ती वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे पराभूत झालो तर हिमालयात निघून जाईल, या पाटील वक्तव्यास फारसा अर्थ नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकारांना सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यातील पत्रकार परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. त्यासाठी कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा, तेथे पोटनिवडणूक लागल्यास मी निश्चितपणे निवडून येईल, मात्र पराभव झाल्यास हिमालयात निघून जाईल, असे वक्तव्य केले होते.
त्याबाबत विचारणा केली असता सतेज पाटील म्हणाले, ‘चंद्रकांत दादांनी २०१९ लाच निवडणूक लढवायला हवी होती, मात्र ते पुण्यातून लढले. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही त्यामुळे अन्य कोणी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. निवडणूक लढविणे त्यातून जय किवा पराजय होणे आणि त्यातून हिमालयात निघून जाण्याचे वक्तव्य करणे यात काही अर्थ नाही.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.