कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार (८) अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळू शकणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना विधिमंडळात याबाबतची घोषणा केली. दरम्यान या मुद्द्यावर विरोधकांनी टीका केली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यापासून जनता लॉकडाउन काळातील वीज बिले माफ करा म्हणून मागणी करीत आहे. त्याकडे अर्थमंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे. गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे कबूल केले होते. या अर्थसंकल्पात त्याचा उल्लेखही केला नाही. दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याबद्दलही सुतोवाच केले नाही. अर्थमंत्र्यांनी केले तरी काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. देवळ बांधून माणस उभं रहात नाहीत, माणूस उभा करायचा आहे. त्यासाठी काही तरी करायला हवे पण अर्थसंकल्पात काहीच वेगळे नसल्याने या अर्थकसंकल्पाकडे पाहून माझी निराशा झाली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.