जनता कर्फ्यू मुळे आपल्या कुटुंब व्यवस्थेला होणार 'हा' फायदा... जाणुन घ्या...

The curfew would be helpful in strengthening the family system
The curfew would be helpful in strengthening the family system

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर केलेला जनता कर्फ्यू ही कुटुंब व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. घरातील सार्वजनिक समारंभाशिवाय कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित असण्याची अशी संधी बऱ्याच दिवसांनी मिळणार असून, केवळ एकत्रित स्नेहभोजनच नव्हे, तर विविध विषयांवर सुसंवाद साधण्याची संधी यानिमित्त मिळणार आहे. 

याबाबत प्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉ. प्रदीप पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अशी वेळ यायला नको होती. मात्र, तरीही प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी किनार असते, असा सकारात्मक विचार आपण करायला हवा. आलेल्या परिस्थितीशी मुकाबला करताना प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करायला हवे. आणीबाणीच्या या परिस्थितीत जाहीर केलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये सर्वांनीच सक्रिय सहभाग घ्यायला हवा. नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांनी सतत धावपळ सुरू असताना अनेक कुटुंबांतील अनेक जणांना यानिमित्त एकत्र सहवास लाभणार आहे. मग कुणी एकत्र पत्ते खेळतील, गाण्याच्या भेंड्या खेळतील, एकत्रित चित्रपट वा नाटक पाहतील किंवा अगदी तांबडा-पांढरा रश्‍श्‍यावर ताव मारतील. प्रत्येकाचे बेत वेगवेगळे असले तरी यानिमित्त मात्र सारे कुटुंब सकाळी सातपासून रात्री नऊपर्यंत एकत्र असेल आणि त्यातून सर्वच सदस्यांनी सुसंवादावर भर दिला पाहिजे.’’

सुरतमध्ये मध्यंतरीच्या काळात आलेल्या एका साथीवेळी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यातून तत्कालीन आयुक्त भाटिया यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आणि त्यातून सुरत चकाचक झाले. तशाच अनेक सकारात्मक गोष्टी निश्‍चितच साऱ्या देशात घडतील, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com