कोनवडे (कोल्हापूर) : परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतं पाण्याने व गाळाने भरली आहेत. त्यामुळे कापणी केलेले भातपीक मळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने भातपिकाची रस्त्यावर मळणी केले जात असल्याचे चित्र भुदरगड तालुक्यातील मिणचे, कुर, हेदवडे परिसरात दिसत आहे.
हेही वाचा - हाताशी आलेले पीक बघता बघता होते फस्त -
शेतात झोडणी करण्यासाठी व खळ्यासाठी कोरडी जागा नसल्याने चिखलातून भाताची वाहतूक करून रस्त्यावर मळणी सुरू असल्याचे चित्र भुदरगड तालुक्यासह सर्वत्र पहावयास मिळत आहे. चार महिने पावसाने धुमाकूळ घातला व पुरामुळे भात आणि ऊससहित इतर पिके उध्वस्त झाली. परतीच्या पावसानेही कहर केला. त्यामुळे पुरातून बचवलेला हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार या भीतीने गाळातूनच भात कापनीस बळीराजाने सुरवात केली.
सध्या शेतात अद्याप चिखल असल्याने खळ्यावरची किंवा खाटल्यावरील भाताची झोडणी शेतात कोरडी जमीन उपलब्ध नसल्याने शेतकरी भात कापणी करून रस्त्यावर धोकादायकरित्या मळणी करताना दिसत आहे. जनावरांसाठी आवश्यक असणारे पिंजर देखील रस्त्यावरच सुकवावे लागत आहे. भुदरगड तालुक्यासह सर्वत्र रस्त्यावरची मळणी पहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजावर धोकादायकरित्या रस्त्यावर मळणी करण्याची वेळ आली आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.