
कोल्हापूर : येथील ओढ्यावरील रेणुका देवीची आंबिल यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक आज पुजारी मदनआई शांताबाई जाधव यांनी प्रसिध्दीस दिले आहे. दरम्यान, शंभर वर्षामध्ये पहिल्यांदाच कोरोनामुळे यात्रा रद्द करावी लागली असून तीस डिसेंबरपासून तीस जानेवारीपर्यंत भाविकांनी गर्दी न करता देवीला नेवैद्य अर्पण करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा - नशीब बलवत्तर म्हणून वाचला आणि गोळीचा निशाना त्याचा डावा हात ठरला -
कोल्हापुरात रेणुका भाविकांची संख्या मोठी असून यंदा सौंदत्ती यात्रा रद्द करण्यात आली आहे. या यात्रेनंतर ओढ्यावरची आंबिल यात्रा होते. मात्र, या यात्रेलाही दोन लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे सोशल डिस्टन्स राखता येणे शक्य नसल्याने प्रशासनाच्या सुचनेनुसार यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, 29 डिसेंबरला परंपरेप्रमाणे ओढ्यावरील मंदिरात कंकणविमोचन सोहळा होईल. सकाळी अभिषेक, अलंकार पूजा, आरती आणि रात्री नऊनंतर पालखी सोहळा होणार आहे. सध्या मंदिरात कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करीत दर्शन दिले जात आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.