
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेसच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. ते लवकरच पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिली. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये शाहू जयंती साजरी झाली. त्यानंतर श्री. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ""राजर्षी शाहूंचे कार्य प्रेरक आहे. समाजातील तळागाळातील माणसाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यांचे जन्मस्थान असलेल्या लक्ष्मीविलास पॅलेसच्या कामात कोणतीही हयगय केली जाणार नाही.''
सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले,""लोकांच्या मनातील राजे म्हणजे शाहू महाराज आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांच्या विचारांचा जागर महाराष्ट्रभर विविध उपक्रमांतून होत आहे. शाहू राजांचे विचार दिशादर्शक आहेत.''
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,""शाहू महाराजांमुळे बहुजन समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढले. कृषी, उद्योग, पाणी व्यवस्थापनात कोल्हापूर जिल्हा पुढे राहिला. त्यामागे शाहूंची दूरदृष्टी कारणीभूत होती.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.