
कोल्हापूर : पुढील पावसाळ्यात आंबेओहळ आणि नागणवाडी प्रकल्पात पाणी अडविणारच, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. दोन्ही प्रकल्पांची कामे ऑक्टोबरपासून सुरू होऊन उन्हाळ्यात घळभरणी पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही प्रकल्पांच्या संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी श्री. मुश्रीफ बोलत होते.
श्री. मुश्रीफ म्हणाले, ""हे काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे. येत्या वर्षात पूर्ण झाले नाही, तर जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांना निवृत्तिवेतन सुद्धा मिळू देणार नाही, कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल.''
पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, प्रांताधिकारी रामहरी भोसले, प्रांताधिकारी विजया पांगारकर, निवासी उपजिल्हाधिकारी कवितके, पुनर्वसन अधिकारी सौ. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
"आंबेओहळ'मधील
पुनर्वसन 72 टक्के
आंबे ओहळ प्रकल्पांतर्गत एकूण प्रकल्पग्रस्त 822 आहेत. त्यापैकी स्वेच्छा निवाडा घेतलेले प्रकल्पग्रस्त 355 आहेत. दरम्यान 467 प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात पात्र आहेत. त्यापैकी 320 जणांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. पंधरा लोकांचे पुनर्वसनाचे प्रस्ताव आले आहेत. त्यानंतर पुनर्वसनाचे काम 72 टक्के पूर्ण होईल. आलेल्या 60 कोटी पैकी 43 कोटींचे वाटप झाले आहे.
नागणवाडीग्रस्तांना पॅकेज
नागणवाडी प्रकल्पात एकूण 330 खातेदार आहेत. त्यापैकी 98 जणांनी स्वेच्छा पुनर्वसन घेतलेले असून 34 प्रकल्पग्रस्तांनी जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. 28 जणांच्या वाटपाला स्थगिती आहे. 87 पुनर्वसनग्रस्तांना आर्थिक पॅकेजचे वाटप केले आहे. 12 प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रकल्प पुनर्वसनाचे काम 78 टक्के पूर्ण झाले आहे.
संपादन ः रंगराव हिर्डेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.