
जयसिंगपूर : पाच-पाच दिवस नळाला पाणी येत नाही. नदीकाठी गाव असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. येणारे पाणीही दूषित असते. कोरोनाने नव्हे तर दूषित पाण्याने ग्रामस्थांवर मरणाची वेळ आली आहे. स्वच्छ आणि मुबलक पाणी आम्हाला मिळणार की नाही असा जाब विचारत उदगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.
सरपंच सलमा मुजावर, ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर यांनी साखळे मळा परिसरात पाणी पुरवठा करण्याची ग्वाही दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. उदगाव येथे पाच दिवसांपासून नळपाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात धाव घेऊन जाब विचारला. प्रॉव्हीडंड फंड, कामगार विमा व चार महिन्याचा पगाराच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. गावाचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे.
सोमवारी सकाळी साखळे मळ्यातील नागरीक अभिनंदन पाटील, बाळू खोत, दिलीप निर्मळे, सविता रजपूत यांनी प्रशासनाला धारेवर धरुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सरपंच सलमा मुजावर, ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनिहाल रांजणे यांनी पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. विमल खोत, मिराबाई भोई, शांताबाई बामणे, हिराबाई पुजारी, कल्पना ठोमके, संगिता रजपूत, शकुबाई व्हनमोरे, शकुंतला चौगुले, वर्षा गवंडी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
दृष्टिक्षेप...
- उदगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा
- अधिकाऱ्यांना धरले धारेवर
- पाणीपुरवठा करण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थ शांत
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कामावर बहिष्काराची भूमिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.