
कोल्हापूर : देशभरात आयोजित केलेल्या पोषण माहमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. शाहूवाडी तालुका जिल्ह्यात पहिला आला असून, करवीर प्रकल्प दोनने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदीची परिस्थिती असतानाही विभागाच्या सर्व पोषण साथींनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने पोषण अभियान दारोदारी, घरोघरी पोहोचविले आहे. त्यामुळेच जिल्ह्याने राज्यात विविध उपक्रम राबवण्यात तिसरा, तर लोकसहभागामध्ये चौथा क्रमांक मिळविला.
गावोगावी राबवलेल्या उपक्रमांची माहिती रात्रंदिवस ऑनलाईन भरणाऱ्या सर्व सेविका, मदतनीस, आशा आदींमुळेच हे शक्य झाले. शाहूवाडी आणि करवीर दोन प्रकल्प यांच्यासह करवीर, कोल्हापूर ग्रामीण, पन्हाळा हे प्रकल्प सर्वोत्तम ठरले. इतर 9 प्रकल्पांनीही अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. या अभियानात जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री, आरोग्य राज्यमंत्री, सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महिला बाल विकास सभापती, सर्व समिती सभापती, सदस्य खाते प्रमुख, गट विकास अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याने ही कामगिरी करणे शक्य झाल्याचे पत्रक जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.