
कोल्हापूर : जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा सातव्यांदा पाण्याखाली गेला आहे. तर, ओढे-नाले तुंडूंब भरून वाहू लागले आहेत. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आणि प्रचंड उष्णता जाणवत आहे. त्यामुळे आज पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या चार ते पाच दिवसात पावसाने उघडीप दिली. काल मात्र जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जिल्हावासियांना झोडपून काढले. बघता-बघता ओढे नाले तुंडूंब भरून वाहू लागले. अनेकांच्या उभ्या असलेल्या भाताच्या लोंब्या जमिनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुलै मध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होता. परंतु, आॅगस्ट मध्ये चांगला पाऊस झाला आणि शेतऱ्यांची चिंता मितटली. पिके जोमात आली. परंतु, काल झालेल्या पावसाने यातील काही पीके जिमिनदोस्त झाली आहेत.
दरम्यान, आज सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा सातव्यांदा पाण्याखाली गेला आहे. नदीची पाणी पातळीही वाढली आहे. आजही उकाडा जाणवत असल्याने तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.