पंचगंगा नदी इशारा पातळीकडे ; नदीकाठ गावांचे स्थलांतर शक्य.......

kolhapur Rajaram water level dam on Panchganga river reached 35 feet
kolhapur Rajaram water level dam on Panchganga river reached 35 feet

कोल्हापूर  :  पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी 35 फुटापर्यंत पोहोचली असून इशारा पातळी केवळ 4 फुटापर्यंत राहिली आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले असून सात ऑगस्ट पर्यंत अशीच  अतिवृष्टी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोल्हापुरात आज पाच ऑगस्ट दुपारी दोनच्या सुमारास पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी   35 फुटापर्यंत पोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. दुपारी एकच्या सुमारास राजाराम  बंधारा पाणी पातळी ३४ फूट ६ इंच होती.  काल सकाळी अठरा फुटापर्यंत तर रात्री 24 फुटापर्यंत असलेली ही पाणीपातळी झपाट्याने  वाढत आहे.

शहरातील परीख पुलासह इतर भागात पाणी साचले आहे. दफन भूमी मध्येही पाणी मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे तेथे विधी करणे ही अशक्‍य होत आहे.जोतिबा डोंगरपरिसरातील रस्ता खचला असून गगनबावड्याकडे जाणारे काही मार्ग बंद झाले आहेत.जिल्ह्यात एकूण पाण्याखालील बंधारे - ९०  असून राधानगरी धरण ही 80 टक्‍क्‍यांहून अधिक भरले आहे

पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठल्यानंतर आंबेवाडी सह परिसरातील गावांना स्थलांतरित करण्याचा इशारा यापूर्वीच प्रशासनाने दिला आहे. सध्या असलेली अतिवृष्टी अशीच आणखीन काही तास राहिली तर आंबेवाडी सह इतर गावांना स्थलांतरित केल्याशिवाय  पर्याय राहणार नाही, याबाबतची चाचपणी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com