
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांकडून वाढू नये, यासाठी शाळा उशिरा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये 9 ते 12 वी जुलैमध्ये सुरू होईल. ऑगस्टमध्ये 5 ते आठवीचे वर्ग सुरू होतील. 1 ते 4 थीपर्यंतचे वर्ग परिस्थिती पाहून सुरू करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनांना आहेत. 2020-21 हे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाल्याने शिक्षकांच्या हातामध्ये केवळ सात ते आठ महिनेच आहेत. त्यात ऑगस्ट ते मार्च या कालावधीत 55 सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्या आहेत. त्यामुळे अध्यापनाला वेळ कमी मिळणार आहे. अशा वेळी कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे.
कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचे सर्व गणितच यंदा कोलमडले. मार्च महिन्यातच शाळा बंद कराव्या लागल्याने परीक्षा झाल्याच नाहीत. राज्य शासनाने सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नवे शैक्षणिक वर्ष कधी आणि कसे सुरू होते याची सर्वांनाच उत्सुकता होती. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने 15 ऑगस्ट नंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी यावे अशी सूचना केली. याची अंमलबजावणी राज्य सरकारने त्या त्या ठिकाणची स्थिती पाहून करायची होती. त्यानुसार राज्य सरकारने शासन आदेश जाहीर करून शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या.
यामध्ये प्रत्येक इयत्तेचे वर्ग कधी आणि कशा पद्धतीने सुरू करायचे याबाबतच्या सूचना आहेत. हा शासन निर्णय पाहता एकंदरीत शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात अध्यापनासाठी ऑगस्ट 2020 ते मार्च 2021 एवढाचा कालावधी मिळणार आहे. जर एप्रिल महिन्यात परीक्षा झाल्या तरच 2021-22 हे शैक्षणिक वर्ष नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होणार आहे. त्यामुळे अवघ्या सहा ते सात महिन्यातच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
या कालावधीत शासकीय सार्वजनिक सुट्या, गणपती, दिवाळी, ख्रिसमस या मोठ्या सुट्टा आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्या अशा सर्व मिळून 55 सुटट्या आहेत.
याबाबतही शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचे तास कमी मिळणार आहेत. पर्यायाने कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल तर अभ्यासक्रम कमी करून चालणार नाही. त्यामुळे सार्वजनिक सुट्ट्या कमी करणे आवश्यक आहे. सार्वजनिक सुट्टी दिवशीही अध्यापन करण्याची तयारी जिल्ह्यातील शिक्षकांची आहे. त्याची कल्पना शासनाला दिली आहे. याचा विचार शासनाने करावा.
- एस. डी. लाड, अध्यक्ष, शैक्षणिक व्यासपीठ
दृष्टिक्षेप
- 9 ते 12 वी जुलैमध्ये सुरू होईल.
- ऑगस्टमध्ये 5 ते आठवीचे वर्ग सुरू होतील.
- 1 ते 4 थीपर्यंतचे वर्ग परिस्थिती पाहून सुरू होणार
- ऑगस्ट ते मार्च कालावधीत 55 सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.