
कोल्हापूर - कागल ते कोल्हापूर असा प्रवास करताना कोरोना हद्दपार झाल्याच्या अविर्भावात रस्त्यावर उतरले आहेत, हा धोका असून प्रसंगी लॉकडाऊन वाढवावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल दिला.
शासकीय विश्रामगृहावर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या श्री. मुश्रीफ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले,'अजूनही कोरोनावर लस सापडलेली नाही. जोपर्यंत ही लस सापडत नाही तोपर्यंत त्याला घाबरूनच आपले जीवन व्यथित करायचे आहे. म्हणून ज्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या आहेत, त्याचे पालन होणे आवश्यक आहे. तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स आणि हात वरचेवर धुणे हे करणे आवश्यक आहे. अशी जर गर्दी आपण केली तर जे दिड-दोन महिन्यात आपण जे घरात बसून मिळवलेले आहे, ते दोन दिवसांत घालवू अशी भिती वाटते.'
ते म्हणाले,'आजची परिस्थिती बघून धोका वाढण्याची शक्यता आहे. म्हणून लोकांनी गर्दी अजिबात न करता अतिशय शांततेने काळजी घेतली नाही तर हा धोका वाढण्याचीसुध्दा शक्यता आहे. आतापर्यंत जे सहकार्य केले तसेच सहकार्य घरात राहून लोकांनी करावे. विनाकारण लोकांनी रस्त्यावर गर्दी केली तर कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे, त्यातून लॉकडाऊनही पुन्हा वाढेल.'
दरम्यान, आज जिल्हाधिकारी यांनी काही दुकानांसह अस्थापना सुरू करण्याचा आदेश दिल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही लोक जत्रेसारखे रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. मोठ्या बाजारपेठा, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने आदि ठिकाणी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.