कोवाड : अतिवृष्टीमुळे चंदगड तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे 30 ऑक्टोबरपर्यंत करून प्रस्ताव सादर करावेत. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिल्या.
कोवाड भागातील चिंचणे, कामेवाडी, दुंडगे, कुदनूर, कालकुंद्री, कागणी व कोवाड येथील पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीनंतर ते बोलत होते. या वेळी आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विजय रनावरे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव शिरोलीकर, तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ""कापणीला आलेले भात पीक जमिनीवर पडल्याने कुजत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला. प्रत्यक्षात पंचनामे केल्याशिवाय बाधित क्षेत्र समोर येणार नाही. पण, शेतकऱ्यांनी काळजी करू नये. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्यांना निश्चितपणाने सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे.
या नैसर्गिक संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील. तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी महसूल व कृषी विभागाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागाची माहिती द्यावी.''
या वेळी विद्याधर गुरबे, विक्रम चव्हाण-पाटील, सचिन बल्लाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य कल्लापा भोगण, जनार्दन देसाई, विलास पाटील, संतोष मळवीकर, अशोकराव देसाई, चंद्रकांत कांबळे, राजू पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिलासा मिळेल
अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याने लवकरच पंचनामे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांची दखल घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
- राजेश पाटील, आमदार
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.