कोल्हापूर - जिल्ह्यात यापूर्वी चारवेळा पोलिस आणि गुंडांत चकमक झाली होती, चारही घटनांत गुन्हेगार ठार झाले होते. तब्बल १३ वर्षांनी पुन्हा कोल्हापूर परिसराने गुंड आणि पोलिसांच्यातील चकमकीचा थरार अनुभवला.
यापूर्वी कामगार नेते दत्ता सामंत यांच्या मारेकऱ्यांनीही कोल्हापुरातील एका मध्यवस्तीत असलेल्या हॉटेलमध्ये आश्रय घेतला होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांच्या पथकाने ताराराणी चौकातील या हॉटेलमधून मुंबईच्या गुन्हेगारी वर्तुळाशी संबंधित गुंडाला अटक केली होती.
ब्या मयेकरचा एन्काउंटर
पोलिस आणि गुंडामध्ये चकमक ही अंडरवर्ल्डची राजधानी असलेल्या मुंबईत नवी नव्हती; पण त्याचे लोण हे कोल्हापूरपर्यंत पोहचल्याचे यापूर्वी घडलेल्या अनेक चकमकीवरून स्पष्ट झाले होते. बेळगावात राहणाऱ्या सुरेश मंचेकर या खतरनाक गुन्हेगाराचाही खात्मा मुंबईच्या पोलिसांनी कोल्हापुरातच केला होता. त्यानंतर स्थानिक पोलिस अनेक वर्षे कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या बाब्या मयेकरचा एन्काउंटर केला होता.
सुरेश मंचेकर याचा एन्काऊंटर
चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील बांदिवडेकर कुटुंबातील सुरेश याचा स्थानिक पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. १९९८ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर कोल्हापुरात गुंड आणि पोलिसांमधील चकमक फारशी
बघायला मिळाली नव्हती. त्यानंतर २००२ मध्ये छोटा राजन टोळीतील बाब्या मयेकर याचा, २००३ मध्ये ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाच्या चकमकीत मंचेकर टोळीचा प्रमुख सुरेश मंचेकर याचा एन्काऊंटर झाला आहे.
यापूर्वीचे एन्काउंटर असे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.