मान्सूनच्या स्वागताला तयारीने सज्ज

मान्सूनच्या स्वागताला तयारीने सज्ज
Updated on

कोल्हापूर ः मान्सूनचे आंदमानात आगमन झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात शेतीची कामे, प्रशासनाची तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीला वेग आला आहे. महापालिकेने नाले सफाईचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. बोटी, लाईफ जॅकेट याची पूर्तताही केली आहे. तसेच आरोग्य सुविधांच्या दृष्टीनेही उपाययोजना केल्या जात आहेत. 
मान्सून हा सर्वांगिण दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. पावसाच्या प्रमाणावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. याची प्रचिती मान्सूनपूर्व तयारीवरून येते. सध्या शेतकऱ्याचे पेरणीसाठी मशागतीचे काम सुरू आहे. तर कांही ठिकाणी धूळवाफ पेरणी सुरु झाली आहे. भात लावणीसाठी रोपे तयार करण्यासाठी भाजणी सुरू आहे. 
जिल्ह्यातील रोहीणा पेरा साधण्याची धांदल सुरु आहे. मात्र याची अधिकृत आकडेवारी कृषी विभागाकडे अद्याप आलेली नाही. बियाणे, खते सर्वत्र उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. पेरणीचे आधुनिक तंत्र पद्धती. बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी, याची माहिती सोशल मीडियावरून कृषी विभागाने प्रसारीत केली आहे. 
पावसाळ्यात शहरामधील नाल्यांचे पाणी आसपासच्या वसतीमध्ये शिरते. म्हणून या नाल्यांमधील गाळ काढण्याचे आणि रुंदीकरण करण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. महापालिकेची आरोग्य विभागातील मान्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. पुराचे पाणी शहरात आल्यास नदी जवळ असणाऱ्या नागरिकांना स्थलांतरीत करण्याच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. 
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये बोटी तयार ठेवणे, नदी काठच्या ग्रमस्थांच्या स्थलांतर करण्याची ठिकाणी निवडणे तेथील व्यवस्था करणे, गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या समित्या नेमून त्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. गत वर्षीचा अनुभव लक्षात घेता या वर्षी आधीच एन.डी.आर.एफ च्या तुकड्या जिल्ह्यात बोलावण्यात येणार आहेत. 
यंदा धरणातील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या पाण्यामुळे पूरपरिस्थीती निर्माण होऊ नये, या दृष्टीने जलसंपदा विभागानेही नियोजन केले आहे. लघु प्रकल्प, गावातील पाझर तलावर यांची मान्सूनपूर्व तपासणी झाली असून डागडुजीची कामे सुरू आहेत. एकूणच जिल्ह्यातील मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून आता प्रत्यक्ष पावसाची प्रतिक्षा आहे. 


ठरावीक बियांणाना शेतकऱ्यांची पसंती 
जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत भात, सोयाबिन, सूर्यफूल ही पीके प्रामुख्याने घेतली जातात. सोयाबीनसाठी जे.एस.335, डी.एस.128 या बियांणांना शेतकऱ्यांची पसंती आहे. तर भात पिकासाठी पारंपरिक इंद्रायणी, आजरा घनसाळ, काळा जिरगा या बियाणांना मागणी आहे. 

खतांची दुकाने उघडी ठेवा 
शहरातील शेती बियाणे, खते विक्री करणारी दुकानेही सायंकाळी सात वाजता बंद केली जातात. मात्र सध्या ऊस पिकाला सेंद्रीय, रासायनिक खताची आवश्‍यकता आहे. पावसाळ्यापूर्वी ही खते देणे आवश्‍यक असते. त्यामुळे शहरातील, गावातील खते विक्री करणारी दुकाने सायंकाळी सातनंतरही उघडी ठेवण्याची मागणी होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com