जनता कर्फ्युबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?  

sambhaji raje chhatrapati comment on Public curfew
sambhaji raje chhatrapati comment on Public curfew

कोल्हापूर : लोकांमध्ये कोरोनाविरुध्द लढण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. देशाचा जीडीपी वजा 23 पर्यंत खाली आला आहे. लोकांचे पोट चालले पाहिजे. त्यामुळे जनता कर्फ्यु करणे हा काही पर्याय नसल्याचे मत खासदार संभाजीराजे यांनी आज व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, देशाचा जीडीपी कमी झाला आहे. याउलट लोकांचा व्यवसाय चालला पाहिजे. त्यांचे पोट भरले पाहिजे. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यु लोकांना परवडणार नाही. व्यवहार चालू राहिले पाहिजेत. लोकांमध्ये जागृता झाली तर ऑक्‍सिजन बेड, व्हेंटिलेटर यांची गरज पडणार नाही. अशी जनजागृती झाली पाहिजे.

चाचण्या वाढवल्या पाहिजेत. प्रशासनावर विश्‍वास ठेवून दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. शासन, प्रशासन, दवाखान्याने लोकांना विश्‍वासात घेतले पाहिजे. त्यांना कोरोनाबाबतची माहिती दिली पाहिजे. लॉकडाऊन किंवा कर्फ्यु केल्यास लोकांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे कर्फ्यु करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com