
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात विविध कारणांनी मृत्यूदर वाढला आहे. एकाच दिवशी अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याने शहर व उपनगरातील स्मशानभूमींमधील दाहिन्या अपुऱ्या पडत आहेत. वडगाव, शहापूर आदी भागातील स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतांच्या कुटुंबियांना वेटिंगवर राहावे लागत आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाचा इतर आजारांनी मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील शवदाहिन्याही कमी पडत आहेत. सध्या वडगाव स्मशानभूमीत 3 तर शहापूर स्मशानभूमीत 6 दाहिन्या आहेत. या दाहिन्यांवर मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रक्षा भरली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. मात्र, सध्या मृत्यूदर वाढल्यामुळे रक्षा भरण्यासाठी गडबड केली जात आहे.
वडगाव परिसरात रविवारी (ता. 23) दहा जणांचा मृत्यू झाला. मात्र, वडगाव स्मशानभूमीत सकाळपासून काही जणांवर अंत्यसंस्कार केल्याने काही मृतदेहावर जुने बेळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागले.
यापूर्वी एकाच दिवसात अधिक प्रमाणात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे स्मशानभूमीत एखाददुसरी दाहिनी उपलब्ध असायची. मात्र सध्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने दाहिन्या कमी पडत आहेत.
वडगाव स्मशानभूमीत केवळ 3 दाहिन्या आहेत. मात्र, मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत असून वडगाव भागात आणखी दोन दाहिन्या बसविण्यात आल्यास अंत्यसंस्कार करण्यास मदत होणार आहेत.
-रतन मासेकर, माजी नगरसेवक
संपादन- धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.