
कोल्हापूर - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातला लॉकडाऊन कायम आहे.यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीशी संबंधीत कामकाज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 17 मार्च 2020 ला आदेश दिले होते.तसेच राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आधीच्या सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे झाले आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये आता नवीन सरपंच, उपसरपंचांची निवड करायची आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातून याबाबत विचारणा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणाने ही पदे रिक्त झाली आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये या पदांची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणाने ही पदे रिक्त झाली आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये या पदांची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी संबंधीत तहसीलदारांना निर्देश देत सरपंच, उपसरपंच पदांची निवड करण्यात यावी.तसेच या बैठका घेताना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती
यासंदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत सरपंच व उपसरपंच यांच्या राजीनाम्याचे वाचन झाल्यानंतर नवीन सरपंच व उपसरपंच निवडीच्या आदेशाकरता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले जात आहेत. त्यानुषंगाने ग्रामपंचायतींनी मासिक सभेमध्ये या पदांच्या निवडणूक विषयक कामकाज घ्यावे याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी शासनास पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुषंगाने आता राज्यात ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती देण्यात आली आहे.
राज्यात ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्यात घेणे बंधनकारक असलेली ग्रामसभा यंदा होऊ शकणार नाही. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले असून जिल्हा प्रशासनास तसे निर्देश देण्यात आल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
ग्रामसभांचे आयोजन केल्यास गर्दीची स्थिती
राज्यात सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या काळात सर्व प्रकारचे मेळावे, कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली असून लोकांना अधिक संख्येने एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन केल्यास होणाऱ्या गर्दीची स्थिती लक्षात घेता ती टाळण्यासाठी राज्यात ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मे महिन्यात बंधनकारक असलेल्या ग्रामसभेचे यंदा आयोजन करण्यात येऊ नये. तसेच पुढील आदेश होईपर्यंत इतर कोणत्याही ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊ नये, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.