कोणत्याही परिस्थितीत महापुरात धरणातील पाणी पंचगंगेत येणार नाही....

will the water from the Mahapura dam reach Panchganga ....
will the water from the Mahapura dam reach Panchganga ....

कोल्हापूर : अतिवृष्टी झाल्यावर धरणातील कमीत कमी पाणी पंचगंगा नदीत यावे, यासाठी आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे. सर्व धरणांत 15 ऑगस्टनंतरच पूर्ण क्षमतेने संचय करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. त्याचा आराखडा तयार केला आहे. याचा आढावा प्रत्येक शुक्रवारी आणि सोमवारी घेतला जातो. 
कोणत्याही परिस्थितीत महापुराच्या काळात धरणातील पाणी पंचगंगा नदीत येणार नाही. आलेच तरीही ते कमीत कमी असावे, असा आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला आहे. गेल्या वर्षीचा अनुभव विचारात घेऊन, हवामान अंदाज देणाऱ्या चार संकेतस्थळांचा विचार करून, तसेच कमीत कमी आणि जास्तीत जास्त पाणी पातळी या शास्त्रीय पद्धतीचा विचार करून हे नियोजन सुरू झाले आहे. 

गेल्या वर्षीचा विचार करता 81 टक्के पाणी मुक्त पाणलोट क्षेत्रातील होते; तर 19 टक्के पाणी धरणातील होते. हे 19 टक्के पाणी जर अतिवृष्टीच्या काळात धरणातून न सोडता साठविता आले तर फक्त मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाणीच पंचगंगा नदीत येईल. त्यामुळे महापुराची तीव्रता कमी होऊ शकते, याचा विचार आराखड्यात केला गेला आहे. 

गेल्या वर्षीचा अनुभव पाहता अतिवृष्टीच्या काळात पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यातून साधारण 23 हजार 143 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत होता. त्यात दोन हजार क्‍युसेक पाणी हे धरणातील होते. गेल्या वर्षी जी पाणी पातळी 55 फूट सात इंच होती, अशी पाणीपातळी वाढू नये, यासाठी सध्याच धरणातून विसर्ग सोडला जातो. त्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी वाढत आहे. ज्या वेळी अतिवृष्टी होईल, त्या काळात धरणातून पाणी सोडले जाणार नाही. तेव्हा त्याची साठवणूक केली जाणार आहे. यामुळे साधारण 15 ऑगस्टनंतरच धरणे पूर्ण क्षमतेने भरली जाणार आहेत. याचा परिणाम पंचगंगेची पातळी कमी होणार आहे. तसेच, इशारा पातळीही उशिरा येईल. 

पंचगंगेत 3.3 टीएमसी सोडले... 
आजच्या परिस्थितीनुसार पंचगंगा नदीत एकूण 3.3 टीएमसी क्‍युसेक पाणी सोडले आहे. पंचगंगा नदीत एकूण कुंभी, कासारी, तुळशी आणि राधानगरी धरणातील पाणी येते. यात आतापर्यंत दोन टीएमसी राधानगरी धरणातून, तर उर्वरित 1.6 इतर कुंभी, कासारी आणि तुळशी धरणांतून सोडले आहे. 

आराखड्याचे तंतोतंत पालनसाठी समिती... 
जलसंपदा विभागाच्या नियोजन आराखड्याचे तंतोतंत पालन करण्यासाठी समिती नेमली आहे. अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्याकडून ती नियंत्रित केली जाते. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी त्याचा आढावा घेतला जातो. त्यामुळे यावर्षी महापुराच्या काळात पंचगंगेत धरणातील पाणी कमीत कमी येईल, त्यामुळे पाणी पातळी कमी राहील, असा अधिकाऱ्यांचा विश्‍वास आहे. 

दृष्टिक्षेप
- सर्व धरणांत 15 ऑगस्टनंतरच संचय 
- आराखडा तयार; सोमवारी, शुक्रवारी आढावा 
- पंचगंगेची पाणीपातळी वाढत आहे. 
- पंचगंगेची पातळी कमी होणार तसेच, इशारा पातळीही उशिरा येईल 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com