मंगळवेढा (सोलापूर) : भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील 39 गावांत सुमारे 42 लाख 82 हजार 168 रुपयांची पाणीपट्टी थकबाकी असल्याने या योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या प्रयत्नातून 39 दुष्काळी गावातील मजूर महिलेच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा कमी करण्याच्या दृष्टीने लोकवर्गणीची अट रद्द करून 39 गावांसाठी भोसे पाणीपुरवठा योजना आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून राबविण्यात आली. या गावाला ऐन उन्हाळ्यात तीन झोनद्वारे घरा- घरांत नळाद्वारे पाणी उपलब्ध झाल्यामुळे या भागातील 39 गावांत गेल्या तीन वर्षांत टॅंकर पूर्णपणे बंद झाला. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे योजना हस्तांतरित करण्यापूर्वी जवळपास 40 गावात 42 लाख 82 हजार 168 रुपयांची पाणीपट्टी थकली. परंतु या ग्रामपंचायतीने पाणीपट्टी आकारणी करून देखील भरली नाही.
दुष्काळामध्ये दिवंगत आमदार भालके यांनी पाणीपट्टी वसुलीबाबत जबरदस्ती करू नये, असे आवाहन केले होते. परंतु त्यावरही ग्रामपंचायतीने पाणीपट्टी न भरल्यामुळे थकबाकी वाढत गेली. त्यामुळे ही योजना चालवणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अशक्य झाल्यामुळे त्यांनी ही योजना जि.प.कडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या बंद योजनेतील तांत्रिक बिघाड, वीज बिल आणि कार्यान्वित यंत्रणेसाठी निधी आदींसाठी तरतूद केली असली तरी ग्रामपंचायतीने थकबाकी भरणे आवश्यक आहे; अन्यथा नंदूर व आंधळगाव योजनेसारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही.
ग्रामपंचायतनिहाय थकबाकी पुढीलप्रमाणे...
योजनेतील गावात नवीन सरपंच निवडीनंतर शिखर समिती स्थापन केली जाणार आहे. योजना सुरू होण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया झाली असून, लवकरच या योजनेचे पाणी सुरू होणार असले तरी या योजनेतील पाणी कायम मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने थकबाकी भरणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी सातत्याने पुरवणे शक्य होणार आहे.
- राजकुमार पांडव,
उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, मंगळवेढा
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.