
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्याच्या दक्षिण भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पडलेल्या पावसामुळे या परीसरातील ओढ्याला पाणी आले. दरम्यान बावची येथील ओढ्यावरील पुलाची एक बाजू वाहून गेल्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. वाहनधारकांना वाहन नेताना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
दक्षिण भागातील सर्वात महत्वाचा मध्यम प्रकल्प असलेल्या शिरनांदगी तलावात म्हैसाळचे व पावसाचे पाणी आल्यामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे. भरलेल्या तलावाचे पाणी शिरनांदगी, चिक्कलगी, बावची,पौट ओढ्यातून पुढे जात आहे. शिवाय सध्या गेल्या चार दिवसांपासून या परिसरात पडलेल्या दमदार पावसामुळे सध्या ओढे तुडूंब पाण्याचे वाहत आहेत. बावची वरून सलगर खु, सलगर बु, लवंगी, तसेच चिक्कलगी वरून मारोळी पुढे सांगली जिल्ह्यातील जतला जाणारी वाहतूक बंद विस्कळीत झाली.
बावची गावाजवळ असलेल्या पुलावर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून या पाण्यामुळे पुलाची एक बाजू वाहून गेल्यामुळे या पुलास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच या भागात जाणाऱ्या वाहनधारकांना आता पर्यायी मार्गाने जावे लागणार आहे, अशी परिस्थिती 2009 सालच्या पावसाने केली होती. लवंगी येथील भैरवनाथ कारखान्याला ऊस गाळपासाठी जाणारी वाहने देखील खुश्कीचा मार्ग म्हणून याच मार्गावरून जात आहेत. कारखानदारीमुळे या मार्गावर ये जा देखील वाढल्याने हा पूल आणखीनच खचला जाणार आहे. पावसाचा कहर ओरसताच सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
हे ही वाचा : अक्कलकोट तालुक्यात धुवांधार पाऊस
शेतकरी हरीदास हिप्परकर म्हणाले, दमदार पावसाने या भागातील पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या पावसाने शेतकरी पुर्ण उध्वस्त केली. पावसामुळे बागा रोगाच्या विळख्यात सापडल्या असून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला आधार देणे गरजेचे आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.