सोलापूर : 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चालू ठेवावी की बंद करावी, या निर्णयासाठी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना चारवेळा कॉल केला. मात्र, एकदाही उत्तर मिळाले नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, बाजार समिती सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
हेही नक्की वाचा : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची कोंडी ! वस्तीगृहे अन् ग्रंथालयांना कुलूप
पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने सोलापुरात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जमाव बंदीचे आदेश काढले आहेत. शहरांमधील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील अध्यापन बंद केले असून वस्तीगृहांनाही टाळे ठोकण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समिती सुरु ठेवायची की बंद, याचे मार्गदर्शन घेण्याच्या उद्देशाने बाजार समितीचे सभापती तथा आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कॉल केले. मात्र, एकाही कॉलला उत्तर न मिळाल्याने देशमुख यांनी बाजार समितीतील व्यापारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर त्यांना शेतमालाचे पैसे देऊन तत्काळ पाठवावे, बाजार समितीत गदी करु नये, अशा सूचना त्यांनी व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.
हेही नक्की वाचा : अर्रार्र मोदी सरकार ! आवास योजनेनंतरही 20 लाख लाभार्थी बेघरच
सभापती विजयकुमार देशमुख म्हणाले...
हेही नक्की वाचा : तुरुंगातील 60 हजार कैद्यांची होणार वैद्यकीय तपासणी
अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना द्यावा प्रतिसाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु की बंद ठेवायची, याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना चारवेळा कॉल केला. मात्र, त्यांच्याकडून एकदाही उत्तर मिळाले नाही. लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांनी कॉल घ्यायला हवा, अशी अपेक्षा आहे.
- विजयकुमार देशमुख, सभापती, सोलापूर बाजार समिती
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.