सोलापूर : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 52 वर पोहचली असून कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वोतोपरी ठोस उपाय केले जात आहेत. वाहनांची व नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून आता सोलापूरसह औरंगाबाद, यवतमाळ, पुणे, मुंबई, नागपूर, नगर, रायगड, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 20) पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी सोलापूर शहरातील सिग्नल यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा.... जनता कर्फ्यू... विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांचा वाॅच
राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यांवरील वाहनधारकांना सिग्नल यंत्रणेमुळे काही मिनिटे एकाच ठिकाणी थांबून राहावे लागत होते. त्यामुळे वाहनाधारकांमध्ये भितीचे वातावरण होते. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला. आता वाहनचालकांना विनाथांबा वाहन चालविता येणार असून पोलिस आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. परंतु, वाहनचालकांनी या कालावधीत स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अपघात होणार नाही याची दक्षता घ्या
कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या भितीने रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी झाली असून वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी काही कालावधीसाठी शहरातील सिग्नल यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे. परिस्थिती बदलल्यानंतर सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरु होईल. वाहनचालकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्त, सोलापूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.