.... तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळेल उभारी 

.... तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळेल उभारी 

नातेपुते (जि. सोलापूर) ः राज्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात दूध व साखर उद्योगाचा सिंहाचा वाटा आहे. कोरोनामुळे ही अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. हे उद्योग वाचले तरच ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होईल. त्यासाठी या उद्योगांकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी केली आहे. 
कोरोनामुळे राज्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटावर विचार विनीमय करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरंसीद्वारे राज्यातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. त्यावेळी रणजितसिंह मोहीते पाटील यांच्याशी संवाद साधला. लॉकडाउन काळातील सहकार व अन्य क्षेत्रातील अडचणींचा आढावा घेतला. 

या वेळी रणजितसिंह मोहीते पाटील म्हणाले, ""लोकडाउनच्या काळात सहकारी व खासगी साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे. साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखर पडून आहे. दळणवळणाच्या अडचणींमुळे साखर उचलण्यासाठी व्यापारी तयार नाहीत. साखर फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकत घेतली पाहीजे. ज्या कारखाण्याकडे इथेनॉल उपलब्ध आहे, ते इथेनॉल कार्पोरेशन ऑफ इंडियाने विकत घेऊन ते स्टोअर करुन ठेवले पाहिजे.'' 

""शासनाने सहकारी दूध संघाकडील अतिरिक्त दुधाची दुध पावडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आज ग्रामीण भागात खासगी दूध संस्थांची संख्याही मोठी आहे. या अडचणीच्या काळात सहकारी व खासगी दुध संस्थाकडे अतिरिक्त दुधाची विल्हेवाट लावण्याची सोय नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा भाव पडला आहे. शेतकऱ्यांकडून खासगी दूध संस्था 15 ते 20 रुपये लिटरप्रमाणे दुध खरेदी करत आहेत. त्यामुळे ऐन अडचणीच्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी शासनाने सहकारी दूध संस्थांकडून दूध खरेदी करुन त्यापासून पावडर बनवली पाहिजे. ती आपत्कालीन परीस्थितीमध्ये उपयोगाला येईल,'' अशी सूचना रणजिसिंह मोहिते पाटील यांनी केली. 

""आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. लॉकडाऊनमुळे शेतकरी कोलमडला आहे. मका या पिकाचा हमीभाव 1760 रुपये प्रति क्विंटल असताना ती 1300-1400 रुपये प्रतिक्किंटल दराने खरेदी केली जात आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा. आपत्कालीन परीस्थितीमधे शेतमाल खरेदी विक्रीसाठी राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने ऑनलाईन खरेदी विक्री व्यवस्था बनविले पाहिजे. त्याचा लाभ शेतकऱ्यांसाठी होऊ शकेल,'' असेही मोहिते पाटील यांनी सांगितले. 

आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असंघटीत कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे. कामगार मंत्रालयाकडे यासंदर्भात निधीही उपलब्ध आहे. त्याचा या अडचणींच्या काळात उपयोग करुन असंघटीत कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवला पाहिजे. शेतकरी, कामगार यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागले पाहीजेत, अशी मागणी रणजितसिंह मोहीते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत केली. महाराष्ट्र
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com