
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बीबीए, एमसीएच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची 19 ऑक्टोबरला परीक्षा झाली तर 4 जानेवारीला ऑनलाइन निकाल जाहीर झाला. मात्र, विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने त्यांचे कॅम्पस् सिलेक्शन होऊनही गुणपत्रिकेअभावी वणवण सुरू आहे. मूळ गुणपत्रिकांसाठी आणखी 15-20 दिवस लागतील, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठ प्रशासनाला झापल्याची चर्चा विद्यापीठात रंगली होती.
हेही नक्की वाचा : खुषखबर ! राज्यात शासकीय मेगाभरतीला अखेर मिळाला मुहूर्त
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑक्टोबरमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचे काम हाती घेतले आहे. नऊ हजार विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढले असून आणखी काही विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्याबाबत निर्णय घेतला जात असल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, 17 मार्चपासून विद्यार्थ्यांची या शैक्षणिक वर्षातील अंतिम परीक्षा होणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली की, सर्वांना एकत्रित गुणपत्रिका देण्याचे नियोजन विद्यापीठाने केल्याचेही सांगण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत, त्याच्या निर्णयाबाबत विद्यापीठाकडून विलंब झाल्यास विनाविलंब विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची सवलत विद्यापीठाने जाहीर केली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांची पदवी पूर्ण झाली आहे, त्यांच्या मूळ गुणपत्रिकेबाबत विद्यापीठाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्याने विद्यार्थ्यांसह पालक वैतागले आहेत.
हेही नक्की वाचा : आठ जिल्ह्यांमध्ये घरफोड्या ! वयाच्या 15 व्या वर्षी पहिली चोरी अन् आता...
विद्यार्थ्यांना भरता येईल विनाविलंब शुल्क परीक्षेचा अर्ज
ऑक्टोबरमध्ये परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने ऑनलाइन जाहीर केले आहेत. आता उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन, निकाल राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा विद्यार्थ्यांना विनाविलंब शुल्कासह परीक्षेचा अर्ज भरण्याची सवलत विद्यापीठाने दिली आहे. पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना काही दिवसांत मूळ गुणपत्रिका दिली जाईल.
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
हेही नक्की वाचा : भाजप खासदारांपुढे पेच ! पुनर्विलोकन याचिका घेतली मागे
ठळक बाबी...
हेही नक्की वाचा : रोहित पवारांची साथ अन् विद्यार्थी आक्रमक ! 'एमपीएससी'मार्फत महाभरती राबवा
कुलगुरुंची विस्कटली प्रशासनावरील घडी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. मृणालिनी फडणवीस यांना संधी मिळाली अन् पहिल्या महिला कुलगुरु म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थीकेंद्रीत कामे होतील, अशी आशा होती. मात्र, त्यांना वर्षाचा कालावधी होऊनही प्रशासनावर पकड निर्माण करता आलेली नाही. त्यांच्या परस्पर परीक्षा विभागाने लॉगिन आयडी तयार करुन विद्यार्थ्यांचे गुण वाढविले. आता विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये संपली, तरीही राखीव विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले नाहीत. 17 मार्चपासून परीक्षा असल्याने हे विद्यार्थी चिंतेत आहेत. यावर कुलगुरुंनी स्पष्टीकरण द्यावे आणि ठोस उपाय सांगून त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशी मागणी उद्या (गुरुवारी) सिनेट बैठकीत केली जाईल, असे सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.