ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची वाढली चिंता 

logo
logo

सोलापूर : ज्या वेळी शेतीत पिकते त्यावेळी शेतमालाला भाव नसतो. ज्या वेळी शेतमालाला भाव मिळतो त्यावेळी शेतात काही नसते अशा दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट घोंगावत आहे. हिवाळ्यातून थंडी गायब झालेली असतानाच सोलापूर शहर व परिसरात सध्या विचित्र वातावरणाचा प्रत्यय येऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. हवेतील गारवा वाढला असून ढगाळ वातावरण होऊ लागले आहे. या वातावरणाची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. 
हेही वाचा - अजितदादांनी दहा मिनिटात "बोरामणी'ला दिले पन्नास कोटी 
या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर व शेतीवर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात सोलापूरच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. गेल्या दोन दिवसात शहरातील किमान तापमानातही घट झाल्याचे समोर आले आहे. हवेतील गारवा वाढल्याने किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरात ढगाळ वातावरण झाल्याने अवकाळी पाऊस हजेरी लावेल अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 
हेही वाचा - या महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळतील प्रत्येकी दहा लाख 
कधी वातावरणात अचानक उकाडा, उन्हाचा चटका तर कधी वातावरणात गारवा आणि ढगाळ वातावरण असे संमिश्र वातावरण सध्या सोलापूर शहर व परिसरात झाले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत सोलापूर शहर व परिसराच्या कमाल व किमान तापमानात वाढ होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com