सोलापूर : मागील 14 दिवसांत तब्बल 17 हजार 594 रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, आता पावसाळा तोंडावर असून राज्यातील मागील काही दिवसांपासून रुग्णांचा वाढणारा आलेख चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा, असे म्हणणे रेड झोनमधील जिल्हा व महापालिका प्रशासनाने सरकारला कळविले आहे.
1 मे रोजी वर्धा, गडचिरोली हे दोन जिल्हे ग्रीन झोनमध्ये तर भंडारा, गोंदिया, वाशिम, चंद्रपूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार व कोल्हापूर हे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये होते. तर चंद्रपूर, नांदेड ग्रामीण व लातूर महापालिकेचा परिसर ग्रीन झोनमध्ये होता. तसेच नागपूर, अमरावती, अकोला, औरंगाबाद, धुळे, नाशिक या जिल्ह्यांतील ग्रामीण भाग ऑरेंज झोनमध्ये तर जळगाव, उल्हासनगर महापालिकेचा परिसरही ऑरेंज झोनमध्ये होता. मात्र, 15 मे पर्यंत परिस्थिती खूपच बदलली असून आता फक्त राज्यातील सिंधुदुर्ग, परभणी, उस्मानाबाद, बीड, वर्धा, भंडारा, गोंदिया, वाशिम व चंद्रपूर हे नऊ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर गडचिरोली हा एकमेव जिल्हा ग्रीन झोनमध्ये राहिला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले, तरीही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करताना परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा सोलापूर, पुणे, मुंबईसह अन्य काही जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.