वळसे पाटील म्हणाले पुण्यापेक्षा सोलापूरचा आराखडा चांगला

Valase Patil said that Solapur planing is better than Pune
Valase Patil said that Solapur planing is better than Pune

सोलापूर : पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी केलेल्या जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ च्या आराखड्याचे कौतुक केले आहे. ‘पुण्यापेक्षा येथील अधिकाऱ्यांनी चांगला आराखडा बनवला आहे,’ अशी कौतुकाची थाप अधिकाऱ्यांवर त्यांनी दिली. दरम्यान हा आराखडा फक्त कागदावर राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. 

झेडपी अध्यक्षांच्या गावातील रुग्णालयास वळसे पाटलांचा हिरवा कंदील
जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवार व रविवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यामध्ये विविध कार्यक्रम त्यांच्या उपस्थित झाले. त्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमापैकीच एक म्हणजे जिल्हा योजन समितीची बैठक होती. महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याला मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्याला बाहेरचे पालकंमत्री मिळाले आहेत. त्यात सरकारकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आली आहे. 
पालकमंत्र्याची जबाबदारी स्विकारल्यानंतरचा वळसे पाटीलांचा शनिवार व रविवारचा सोलापुरातील पहिलाच दौरा होता. त्यामुळे याला विशेष महत्त्व आले होते. या दोन्ही दिवसात त्यांचे नियोजनबद्द कार्यक्रम झाले. जिल्हा योजना समितीची पहिलीच बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या कामाची झलक दाखवून दिली. अतिशीय शिस्तबद्द झालेल्या या बैठकीत त्यांनी सर्वांचे ऐकून समाधानकारकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांच्या काही प्रश्‍नांना उत्तर देताना ‘माझी ही पहिलीच बैठक असून माहिती घेऊन सांगतो, पुढच्यावेळी सर्व प्रश्‍नाची उत्तरे मिळतील, असे सांगितले. बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ उपस्थित होते. पालकमंत्री वळसे पाटील म्हणाले, सोलापुरच्या अधिकाऱ्यांनी पुण्यापेक्षा चांगला आराखडा तयार केला आहे फक्त त्याची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. 

६० टक्के निधी उपलब्ध

रविवारी झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या प्राधान्यांच्या योजना लक्षात घेवून सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी ११.६ कोटीची अतिरिक्त मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबर २०१९-२० मध्ये सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनांच्या १५ जानेवारी २०२० अखेपर्यंतच्या खर्चाचा त्यांनी आढावा घेतला. २०१९-२० साठी जिल्ह्याला सरकारकडून ६० टक्के निधी उपलब्ध झाला आहे. त्याप्रमाणे सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनांवर ७६ टक्के खर्च झाला असल्याचे सांगितले. ज्या भागाचा खर्च राहिला आहे. त्यांनी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्र्यांच्या प्राधान्यक्रमामुळे सोलापुरातील `हा` प्रकल्प अडचणीत
२०२०-२१ चा आराखडा...
जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ साठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील प्रारूप आराखड्यासाठी यंत्रणेणी ८४१.८१ कोटीची मागणी केली आहे. त्यापैकी ५०५.६९ कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली असून ११६.०० कोटीची अतिरिक्त मागणी सरकारकडे केली जाणार आहे. यासाठी पुण्यात सोमवारी (ता. २७) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सर्व जिल्ह्यांची बैठक होणार आहे. त्यात निधीची मागणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com