
सोलापूरः लॉकडाउनमध्ये घरात अडकलेली माणसे घराबाहेर जाऊ लागली. त्यासोबत शहरातील तलावांच्या काठावर पुन्हा प्लास्टिक कचरा पडत आहे. यामुळे तलाव परिसरात घाण वाढत आहे.
शहरात कंबर तलाव, सिद्धेश्वर तलाव हे दोन प्रमुख जलाशय आहेत. तलाव परिसरात मानवी वस्ती आहे. मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउनने नागरिक घराबाहेर फारसे गेले नव्हते. अगदी तलावाकाठी कोणत्याही प्रकारचा कचरा नव्हता. अनेक वर्षांनंतर केवळ माणसाची वर्दळ कमी झाल्याने तलावाचे पाणी स्वच्छ झाले होते. जलाशयातील पाण्यास नैसर्गिक निळाई अगदी सहजपणे दिसत होती.
हेही वाचाः जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
नंतर मागील आठवड्यापासून अनलॉक सुरू झाले. बाजारपेठ उघडल्याने ग्राहकांची गर्दी सुरू झाली. त्यासोबत पॅकिंगचा कचरा पसरण्यास सुरवात झाली. जलाशयाच्या काठाने असलेल्या रस्त्यावर माणसांची वर्दळ वाढली आहे. तलावाच्या काठाने पॉलिथिन बॅग, प्लास्टिकचे ग्लास, कागदाचे तुकडे, प्लास्टिकचे फुटके डबे असा अनेक प्रकारचा कचरा टाकत आहेत. कचरा न टाकण्याच्या सूचना असताना नागरिक कचरा टाकत आहेत.
प्रत्यक्षात मनपाकडून वाहनाद्वारे शहरात कचरा संकलन सुरू असते. मात्र, तरीही काहीजण तलावाच्या काठावर कचरा आणून टाकतात. त्यामुळे लॉकडाउन उठताच कचऱ्यामुळे तलावाचे काठ बेढब दिसू लागले आहेत. घाणीमुळे जलाशयाचे पाणी दूषित होत आहे. प्रदूषणमुक्त जलाशय पुन्हा एकदा कचऱ्याच्या विळख्यात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.