Bhondu baba
sakal
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) - भोंदू अशोक खरातविरोधात तक्रार दाखल होऊन आज दोन महिने पूर्ण झाले. या प्रकरणानंतर राज्यभरात तब्बल पस्तीस भोंदू बाबांवर गुन्हे दाखल करून त्यांचे दरबार पोलिसांनी उधळून लावले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही माहिती संकलित केली असून राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह रंजना गवांदे व सहकार्यवाह विष्णूदास लोणारे यांनी ही आकडेवारी दिली.