सांगली : आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरवर नियंत्रित ठेवू, तसेच आवश्यकता असल्यास हिप्परगी धरणातून (Hippargi Dam) विसर्ग करू, अशी ग्वाही कर्नाटक शासनाने दिली. महापुराच्या कालावधीत सर्व विभागांमध्ये आंतरराज्य समन्वय ठेवण्याच्या सूचनाही दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.