उद्योजक विचारतायेत; 15 एप्रिलनंतर काय?

indus.jpeg
indus.jpeg
Updated on

सांगली : सध्याच्या कोरोना लॉकडाऊनच्या फेऱ्यात जिल्ह्यातील एक हजारांवर उद्योग बंद आहेत. येत्या 15 एप्रिलनंतर पुन्हा हे उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठीच्या हालचाली करण्यासाठीचे दिशादिग्दर्शन राज्य शासनाने आधीपासून करावे अशी अपेक्षा उद्योजकांची आहे. लॉकडाऊनचा निर्णय जसा अचानक घेतला तसा ते उठवण्याचा निर्णय मात्र अचानक नको अशी त्यांची अपेक्षा आहे.

जिल्ह्यात तीनशेपेक्षा कामगार असतील असे उद्योग पंधरा ते वीस इतकेच आहेत. बाकीचे बहुतेक लघुउद्योगच आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड येथील औद्योगिक वसाहतीसह जिल्हाभरातील सर्व उद्योग आता बंद आहेत. त्यांच्यासमोर येत्या काळात मोठे वित्तीय संकट उभे ठाकले आहे. पुरवठा साखळी सुरळीत होऊन उत्पादनाचा गाडा रुळावर येण्यास किमान सहा महिने लागतील असा अंदाज आहे. यात धक्‍क्‍यातून आर्थिक गाडी रुळावर न आल्यास किमान पंचवीस ते तीस टक्के उद्योगांना टाळे लागू शकते अशी भीतीही व्यक्त होत आहे.
 


या पार्श्‍वभूमीवर सांगली-मिरज मॅन्युफॅक्‍चरर्स असोशिएशनचे अध्यक्ष संजय आराणके म्हणाले,""मशिनरीची देखभाल, कारखान्याची स्वच्छता यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी हवा. त्यामुळे 15 एप्रिलनंतरच्या मार्गदर्शक सूचना शासनाने तातडीने जाहीर कराव्यात. उद्योग क्षेत्र कमालीच्या अडचणींमधून जात आहे अशावेळी तातडीने संबंधित अनेक निर्णय केले जावेत. आम्ही जिल्हा उद्योग केंद्राशीही याबाबत संपर्क साधला आहे.''


ते म्हणाले,""15 एप्रिलनंतर उद्योग सुरू करतानाही काही दक्षता घेणे गरजेचे असेल. त्यात प्रामुख्याने स्वच्छता व सुरक्षा याबरोबरच पंच्चावन वर्षांवरील व आजारी कामगारांचा विश्रांती कालावधी वाढवणे, शिफ्ट वाढवून कामाच्या वेळी कामगार एकमेकांच्या जवळ येणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. त्यांच्या जेवण-चहापाण्यासाठी व्यवस्थांमध्ये बदल करणे, स्वतंत्र सुपरवायझरकरवी त्यांच्याकडून कोरोना साथीबाबतच्या सुरक्षा उपाययोजनांचे पालन होत असल्याबाबत दक्षता घेणे अशा गोष्टी उद्योजकांना कराव्या लागतील.''
उद्योग भारतीचे जिल्हा समन्वयक माधव कुलकर्णी म्हणाले,""सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात कामगारांचे राज्याबाहेर स्थलांतर फारसे झालेले नाही मात्र या सर्व कामगारांना पुन्हा एकदा कामावर येण्यासाठी आगाऊ सूचना देणे गरजेचे आहे. विशेषतः वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच आवश्‍यक असल्यास कामगारांसाठी ओळखपत्रे तयार करणे अशा गोष्टींबाबत शासनाने आधीच निर्णय घेतले पाहिजेत. पूर्वसूचना देऊन शासनाने निर्णय करावेत.''
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com