पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायचाय मग 'हे' करा....

Environment Balance Must Be Birds Kolhapur Marathi News
Environment Balance Must Be Birds Kolhapur Marathi News

कोल्हापूर : एका वर्षी चीनमध्ये धान्याचा उतारा कमी आला. त्यावर तेथील सरकारने संशोधकांना यामागील कारण शोधण्यास सांगितले. पक्ष्यांमुळे उत्पादन घटल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी सरकारने पक्षी मारण्याचा आदेश काढून जादा पक्षी मारणाऱ्यांसाठी बक्षीसही जाहीर केले. त्यामुळे चीनमधील ७० ते ८० टक्के पक्षी मारण्यात आले. दुसऱ्या वर्षी पुन्हा धान्य उत्पादन तपासले असता ते गतवर्षीपेक्षा आणखीच घटल्याचे निदर्शनास आले. पक्षी मारूनही उत्पादन का घटले, असा प्रश्‍न संशोधकांना विचारण्यात आला आणि त्यामागील कारण शोधण्यास सांगण्यात आले.

त्यावर जितके धान्य पक्ष्यांमुळे कमी झाले, त्यापेक्षा जादा धान्य हे कीड आणि रोगाला बळी पडल्याचे स्पष्ट झाले. किड्यांना पक्षी खात होते. त्यामुळे सरकारने पुन्हा पक्षी पाळण्याचे लोकांना आवाहन करून त्यासाठी बक्षीस जाहीर केले. कणेरीमठ येथील अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी ‘जीवांचे सृष्टीतील महत्त्व’ याविषयी चर्चा करताना सांगितलेली ही माहिती बरेच काही सांगून जाते. म्हणजेच ही सृष्टी अशी आहे की येथे सर्व जीव आवश्‍यक आहेत.

प्रत्येक जीव महत्वाचा

कोणालाही मारून चालणार नाही. कारण प्रत्यक्ष नसेल, पण अप्रत्यक्षपणे प्रत्येक जीव पर्यावरण संतुलनासाठी मदत करत असतो. पूर्वी पहाटवेळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यायची; परंतु ते आता दुर्मिळ होत चालले आहे. विविध कारणांनी पक्ष्यांचे अस्तित्व धोक्‍यात येत असल्याचे चित्र आहे. निसर्गातील किडे, मुंग्या खाऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्वी नांगरणी करताना नांगराच्या पाठीमागे पांढरे बगळे दिसायचे. जमिनीची उलथापालथ होताच आतून किडे, अळ्या बाहेर निघताक्षणीच ते फस्त करत असत. पिकांवरील किडे, अळ्यांनाही अचूक टिपत; परंतु ते चित्र आता दुर्मिळ होत चालले आहे.

पर्यावरण संतुलनासाठी मदत

त्यामुळे लष्करी अळी आणि जमिनीखाली हुमणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गहू, मका, पालेभाज्या, कडधान्यांच्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी किटकनाशकांची फवारणी केली जात आहे; परंतु या माध्यमातून विष पोटात जात आहे. पूर्वी किमान कुटुंबासाठी लागणारे धान्य पिकवणारा शेतकरी आता जादा उत्पादन, तसेच जादा पैशासाठी नगदी पिकांकडे वळला आहे. त्यामुळे पक्ष्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच राहिलेला नाही. तसेच वृक्षतोड, वाढते नागरीकरण, निसर्गातील ढवळाढवळ, बदलत्या हवामानाचा पक्ष्यांच्या राहणीमानावर परिणाम होऊ लागला आहे.

टेरेस गार्डनची आवश्यकता 

शेतकऱ्यांमध्ये नगदी पिकांकडे वाढलेला कल यामुळे पक्षी अन्नाच्या शोधात स्थलांतरित होऊ लागले आहेत. पक्ष्यांना पुन्हा आणण्यासाठी अनेक पक्षीमित्र पक्षीगणनेच्या माध्यमातून आजच्या तरुणाईमध्ये पक्ष्यांविषयी जागृतीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आज अंगण नाही, परस नाही, सिमेंटची जंगले वाढतच आहेत. यामध्येही आपण पक्ष्यांसाठी काही करू शकू, असा पक्षीमित्रांना विश्‍वास आहे. टेरेस गार्डन फायदेशीर ठरू शकते, असे त्यांचे सांगणे आहे. यासाठी ते प्रबोधन करत आहेत. या माध्यमातून टेरेस गार्डन उभे केल्यास पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होऊन पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवायला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com