

Farmer loan waiver Maharashtra statement chandrakant patil
esakal
Chandrakant Patil statement : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठीची पूर्वतयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणूक आचारसंहिता त्यात आडवी येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.