शिरढोण : नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे शॉर्टसर्किटने एक एकर ऊस जळाल्याने शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली..नरसिंहगाव येथील बाळासाहेब नामदेव कदम या शेतकऱ्याची शेतजमीन नूतन कॉलेजच्या पश्चिमेस आहे. त्यांनी ३० गुंठेमध्ये गत वर्षी दिवाळीला उसाची लागण केली होती, तर उसाच्या फडामध्ये ठिबक संच टाकण्यात आले होते. उसाच्या फडाच्या मध्यभागामधून ‘महावितरण’ची विजेची तार गेली आहे. काल मध्यरात्री शॉर्टसर्किटने अचानक उसाने पेट घेतला..यावेळी कदम या शेतकऱ्याला अचानक झालेल्या प्रकाराने काहीच सुचले नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मध्यभागी लागल्याने ऊस व ठिबक संच जळाला. यामध्ये शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. या उसाच्या फडाला कारखान्याची ऊसतोड येणार होती. उसाच्या शेजारी चारी बाजूने अन्य शेतकऱ्यांचा ऊस व द्राक्षबाग आहे. येथील शेतकऱ्यांनी चारी बाजूंनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
शिरढोण : नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे शॉर्टसर्किटने एक एकर ऊस जळाल्याने शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली..नरसिंहगाव येथील बाळासाहेब नामदेव कदम या शेतकऱ्याची शेतजमीन नूतन कॉलेजच्या पश्चिमेस आहे. त्यांनी ३० गुंठेमध्ये गत वर्षी दिवाळीला उसाची लागण केली होती, तर उसाच्या फडामध्ये ठिबक संच टाकण्यात आले होते. उसाच्या फडाच्या मध्यभागामधून ‘महावितरण’ची विजेची तार गेली आहे. काल मध्यरात्री शॉर्टसर्किटने अचानक उसाने पेट घेतला..यावेळी कदम या शेतकऱ्याला अचानक झालेल्या प्रकाराने काहीच सुचले नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मध्यभागी लागल्याने ऊस व ठिबक संच जळाला. यामध्ये शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. या उसाच्या फडाला कारखान्याची ऊसतोड येणार होती. उसाच्या शेजारी चारी बाजूने अन्य शेतकऱ्यांचा ऊस व द्राक्षबाग आहे. येथील शेतकऱ्यांनी चारी बाजूंनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.