तारळी धरणाचे पाचही दरवाजे बंद

The five doors of the Tarli Dam are closed
The five doors of the Tarli Dam are closed
Updated on

तारळे (पाटण)- तारळेसह संपुर्ण विभागात तसेच तारळी धरण क्षेत्रात सुमारे दीड महिना सातत्यपुर्ण अविश्रांत पडणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. कालच्या दिवसात 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गत 19 जुलै पासुन धरणातुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग धरणाचे पाचही दरवाजे बंद करून काल दुपारी एक वाजल्यापासुन बंद करण्यात आला आहे. 

धरण क्षेत्रात सुमारे 1 जुलै पासुन दमदार पावसाला सुरुवात झाली होती. कधी रिमझिम, कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस गत दीड महिन्यात काही दिवसांचा अपवाद वगळता सुरुच होता. धरणाने 85 टक्क्याची आकडेवारी पार केल्यावर धरण व्यवस्थापनाने पाणी साठा नियंत्रित करण्यासाठी 19 जुलैला धरणाचे पाच दरवाजे उघडुन सुमारे 2200 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु केला होता. पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर महिनाभर धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु होता. पावसाचा जोर ओसरल्याने तसेच धरण 100 टक्के भरण्यासाठी धरण व्यवस्थापनाने काल दुपारी एक वाजता धरणाचे पाचही दरवाजे बंद करुन विसर्ग थांबविण्यात आला.

तारळी धरण क्षेत्रात आज अखेर एकुण 1911 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 5.85 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणात एकुण पाणीसाठा 5.22 टीएमसी झाला असुन 89 टक्के धरण भरले आहे. अजुनही 2558 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Marathi News Esakal
www.esakal.com