एकमेकांना सावरण्याची केविलवाणी धडपड ; पाचजण अतिदक्षता विभागात 

Five people in the vigilance section for belagavi tractor accident
Five people in the vigilance section for belagavi tractor accident

खानापूर : ट्रॅक्‍टरसह ट्रॉली नाल्यात कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची प्रकृती स्थिर आहे. पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मात्र, सहा जणांच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने गाव अद्याप सावरलेले नाही. गावावरील शोककळा कायम असून सर्वजण हादरले आहेत. एकमेकांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. 

हे पण वाचा - रामकंद छे ! हे तर... 
 

शनिवारी (ता. 8) बोगूरहून इटगीकडे ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह तट्टीनाल्याच्या पुलावरून कोसळला होता. त्यात पाच महिलांसह सहाजण जागीच ठार झाले होते. 18 जण जखमी झाले होते. ट्रॅक्‍टर 25 वर्षांपूर्वीचा असल्याने विमा मिळण्याचीही सोय नाही. त्यात मयतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे जखमींपैकी कुणी दगावणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती धोक्‍याबाहेर असली तरी पाचजणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही बोगूरवासीय सावरलेले नाहीत. हुंदक्‍यांनी गावातील वातावरण शोकाकुल बनले असून मृतांच्या कुटुंबीयांना सावरताना वडिलधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मृतांच्या घरातील व्यक्ती आणि नातेवाईकांचा जखमींमध्ये समावेश असल्याने अंत्यसंस्कार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून मार्ग काढत शनिवारी रात्रीच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने मयतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

आई-बाबा कुठे गेले? 
मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. त्यातील सावित्री हुनशीकट्टी (वय 35), अशोक केदारी (वय 45) व यल्लम्मा हुनशीकट्टी (वय 45) यांच्यासह जखमी महिलांची मुले लहान आहेत. मृतदेह गावात दाखल झाल्यानंतर आपल्याही आई-वडिलांचे बरेवाईट झाल्याचे समजून त्या मुलांनी एकच आक्रोश केला. आमचे आई-वडील कुठे आहेत, अशी विचारणा ती करत होती. मृतांमधील अशोक केदारी यांच्या पत्नी रुग्णालयात आहेत. घरी म्हातारी सासू आणि दोन लहान मुली आहेत. त्यांना सावरताना नातेवाईकांची तारांबळ उडत आहे. 
मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जात आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारने उचलावा, अशी विनंती राज्य सरकारला करण्यात येणार आहे. सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे. 
- रेश्‍मा ताळीकोटी, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com