

agriculture payment
sakal
सांगली : जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम आटोपला आहे. यंदाच्या हंगामात सोळा साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. यापैकी सहा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिले जमा केली आहेत, तर दहा साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे तब्बल २८० कोटी ७३ लाख रुपयांची ‘एफआरपी’ थकीत आहे. त्यामुळे शेतकरी बिलाची प्रतीक्षा करू लागला आहे.